नेताजी - एक निष्ठावान देशप्रेमी


नेताजी - एक निष्ठावान देशप्रेमी

आपण वाचत आलेल्या "प्रत्यक्ष मित्र "  मधील  "नेताजींच्या लेखमालेमधील" लेखांमधून नेताजींचे देशप्रेम हे किती सच्चे
होते ते कळते . पण नेताजींची हि देशप्रेमाची ओढ त्यांच्या वडिलांना म्हणजेच जानकीबाबूंना अस्वस्थ करीत होती. ते देशप्रेमाच्या विरोधात होते असे नाही परंतु फक्त पुत्र प्रेमापोटी ते नेताजींना ह्या सगळ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. कारणही तसेच होते.
ह्याच दरम्यान इंग्रजी साम्राज्यामध्ये अनेक बदल घडत होते. बंगालची फाळणी, कालाकत्त्या ऐवजी  दिल्लीला राजधानीचे स्थान आणि त्यासाठी नवी दिल्लीची स्थापना व्होइसरॉयच्या शोभायात्रेवर बॉम्ब फेक ह्या आणि बऱ्याच घटना. आणि त्यामुळेच जानकीबाबूंनी नेताजींना प्रेमळ शब्दांत समजावले कारण त्यांना माहित होते कि दमदाटी करून काहीच फायदा नाही. म्हणून जानकीबाबूंनी नेताजींना सांगितले कि "निदान शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी तू ह्या भानगडींमध्ये पडू नकोस."
त्यामुळे नेताजींचे बाहेर जाणे कमी झाले पण त्यांच्या वाचनामध्ये कोणाताही खंड पडला नाही.
त्यातच त्यांना कि जसे स्वामी विवेकानंद जींना श्री रामकृष्ण परमहंस यांसारखे गुरु लाभले तसेच आपल्याला सुद्धा आपल्या पुढील वाटचालीसाठी गुरूची आवश्यकता आहे आणि मग त्यांचा शोध सुरु झाला  तो गुरूंचा. आणि अशातच त्यांची मट्रीकची परीक्षा जवळ आली. आणि मग जानकीबाबूंची काळजी अधिकच वाढली, त्यांना वाटले हा काही हि परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य नाही. पण शेवटी ते नेताजी होते…
खऱ्या आणि सच्च्या प्रयासांना परमेश्वर यश देतोच . नेताजी दुसरे आले परीक्षेमध्ये. म्हणजेच एका निष्ठावान देशप्रेमी बरोबरच एक हुशार विद्यार्थी म्हणूनही नेताजी सगळ्यांसमोर आले .

- सुप्रिया नार्वेकर

संदर्भ :- प्रत्यक्ष मित्र
http://www.newscast-pratyaksha.com/hindi/hindi-netaji-subhashchadra-bose-6/ )


1 comments: