सर अब्दुल कलाम
भारत भूमी सांगून जाते
कलाम सरांची गाथा
सर्व संकटांनी टेकविला
त्यांच्या पुढे माथा
कुटुंब गरीब ,
परिस्थिती बिकट
आत्मविश्वासाने दूर केली
अडचणींची वाट
सकारात्मकतेचे बीज रोवुनी
घातले त्यास कार्यक्षमतेचे पाणी
जिंकले सर्वांस स्वकर्तृत्त्वाने
वरी दिसता साधी राहणी
अभिमान वाटे साऱ्यांना
असे भारताचे हे सुपुत्र
भारत महासत्ता होणारच
ह्यांनीच रेखिले सुंदर चित्र
भारताच्या मनाच्या तुऱ्यात
रत्ने जरी अनेक
तरीही कलाम सरांसारखे
अनमोल रत्न मात्र एकच
अशा ह्या अग्निपंखाला
आमचा अखेरचा सलाम
सदैव आमच्या मनात
असतील आमचे
लाडके सर अब्दुल कलाम
- सुप्रिया नार्वेकर
बोरिवली - पूर्व
0 comments: