कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५ (भाग - १)


कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर-२०१५
(भाग - १)

कधीही न पाहिलेले,अनुभवलेले, विचारांच्या पलीकडचे वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर.
हा माझ्यासाठी प्रवास होता , क्षण होते , अनुभव होता , सेवा होती नक्की काय होते हे शब्दांत सांगणे कठीण.
पण जे होते ते फक्त अदभुत होते ,अविस्मरणीय होते.
आता तुम्ही म्हणाल कित्येक ठिकाणी आरोग्य शिबीर होतात मग ह्यात काय एवढे वेगळे ?
कारण हे फक्त शिबीर नसून हे सेवा शिबीर आहे . इथे मला "सेवा" ह्या शब्दाचा खास उल्लेख करावासा वाटतो कारण ,
अत्यंत निरपेक्ष भावनेने,अत्यंत प्रेमाने केले जाणारे कार्य म्हणजेच
"कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर"

मी स्वतः ह्या शिबिरासाठी पहिल्यांदा गेले होते.
खूप श्रद्धावान स्नेहयांकडून शिबिराबद्दल ऐकून होते , photos पाहिले होते परंतु
ऐकणे आणि प्रत्यक्ष अनुभवणे ह्यातला फरक मला शिबिराला गेल्यावर समजला.
Shree Aniruddha Upasana Foundation ,
Dilasa Medical Trsut and Rehabilitation Center
Shree Aniruddha Aadesh Pathak
SHhreeguru Upasana Foundation
Aniruddha's House of Freinds
ह्यांच्या सयुंक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केले जाते .
ह्या वर्षीच्या शिबिराची तारीख होती १ फेब्रुवारी २०१५ ते २ फेब्रुवारी २०१५.
२ दिवसांच्या ह्या शिबिरामध्ये मला आलेले अनुभव , शिबिराचे स्वरूप , वेगवेगळ्या श्रद्धावानंसोबत केलेली चर्चा ,
गावकरी,लहान मुले ह्यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा हे सगळे मी तुमच्याबरोबर share करणार आहे .
शिबिरात भेटलेल्या खूपशा स्थानिक स्वयंसेवकानकडून तसेच काही श्रद्धावान स्नेह्यांकडून ह्या शिबिराची खूप माहिती मिळाली.
आणि ह्या सगळ्यामधून ५-६ वेगवेगळ्या भागांमधून कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर ह्याची माहिती देण्याचा प्रयास आहे .
मी खूप ऋणी आहे देवा तुझी  कि मला ह्या कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबिराच्या सेवारूपी महासागरातला  एक थेंब होण्याची संधी दिलीस.

कोल्हापूर शहर म्हणजेच करवीर नगरी ,आपल्या महालक्ष्मी आईचे पवित्र स्थान.
ह्याच करवीर नगरीतील शाहुवाडी तालुका आणि त्यामधले  पेंडाखळे हे गाव आणि तसेच आसपासची अनेक लहान लहान गावे.
हे शिबीर इथे सुरु होण्याआधी काही वर्षांपूर्वी दैनंदिन गरजेच्या गोष्टी , मुलभूत सोयी - सुविधा सुद्धा इथे उपलब्ध नव्हत्या . देवदासी सारख्या रूढी होत्या .
अस्वच्छता, क्षिक्षणाचा अभाव ,पाणी,वीज ह्यांची कमतरता आणि ह्या सगळ्यापेक्षाही बिकट परिस्थिती होती.
आणि
आता  चित्र पूर्णपणे पालटले आहे .आमुलाग्र असा बदल इथे पहायला मिळतो .

हे शिबीर २ भागांत विभागलेले असते.

1 st Day Of Camp

2 nd Day Of Camp









१ ल्या दिवशी नजीकच्या गावांमध्ये आरोग्यविषयक गोष्टी ,साड्या , खेळणी , कपडे इ. गोष्टींचे वाटप केले जाते .
आणि २ ऱ्या दिवशी camp site वर medical camp आणि अन्नपूर्णा महाप्रसादम चे आयोजन असते .
आसपासच्या गावातील हजारो गावकरी आणि मुले इथे येउन आपल्या शरीराची तपासणी करून घेतात.

ह्याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण पुढे घेऊच .
हे सगळे पहिले कि कळते
हे कोणा एकट्या व्यक्तीचे काम नाही.
तर हे Team Work आहे
संघशक्ती चे उत्तम उदाहरण म्हणजे "कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य सेवा शिबीर " !!!
उच्चस्तरीय management companies ला पण थक्क करून सोडेल असे
उत्कृष्ट पद्धतीचे व्यवस्थापन !!!

वर पाहता शिबीर फक्त २ दिवसांचे असते परंतु त्या मागची मेहनत संपूर्ण वर्षभराची असते .
"पूर्वतयारी " ह्या पुढच्या भागात आपण ह्याबद्दल सविस्तर जाणून घेऊच .
एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ह्या शिबिरामध्ये नुसते उरकून द्यायचे आहे असा भाव कुठेही नसतो .
प्रत्येक स्वयंसेवक अतिशय प्रेमाने ,मनापासून ह्या सेवा शिबिरामध्ये स्वतःला झोकून देतो .
निर्मळ मनाने , निरपेक्ष भावनेने आणि प्रबळ इच्छाशक्तीने केलेले प्रत्यके कार्य हे उत्तम आणि यशस्वी होतेच !!!
ह्या शिबिरात पाहिलेल्या कित्येक गोष्टी ने तोंडात बोट घालायची वेळ येते.
कुठेही बेशिस्त नाही , धक्का बुक्की नाही , वाद-विवाद नाही , कसलीही गैरसोय नाही , कुठलाही त्रास नाही.
खरच हे सगळे पहिले कि काय म्हणावे तेच सुचत नाही .
जागोजागी दिसतात ते फक्त सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे निष्ठावान कार्यकर्ते !!!
हा चमत्कार आहे , हि जादू आहे , तर नाही
हे फक्त प्रेम आहे
फक्त प्रेम !!!

सगळीकडे पहायला मिळते ते फक्त चैतन्य !!!
मी पाहिलेला , अनुभवलेला , मनाला भावलेला , येणाऱ्या प्रत्येक वर्षी पुन्हा पुन्हा ओढ लावणारा हा Kolhapur Medical and Healthcare Camp
तुमच्या पर्यंत पोहण्याचा हा एक छोटासा प्रयास . आशा करते कि तुम्हाला माझा हा प्रयास आवडेल .
उद्यापासून रोज आपण टप्प्या टप्यांमध्ये ह्या शिबिराची माहिती घेणार आहोत .
मग भेटूया उद्या !!!

http://aniruddhabapu-kolhapur-medicalcamp.blogspot.in/p/blog-page.html

 क्रमश: ...

सुप्रिया नार्वेकर

प्रेम कशाला म्हणायचे?


तुझी माझी आठवण...

Tuzi Mazi Aathavan
  

Poem Published in Pratyaksha Newspaper on dated 
Saturday, 26th July 2014 



तुझी माझी आठवण

डोळ्यात तुझ्या
भाव गुंतलेले
पाहताच तुला
मन वेडे झाले

ओठ मिटले
शब्द थांबले
ओंजळीतूनी तुझ्या
प्रेम सांडले

मुक्या झाल्या दिशा
मुके झाले जग सारे
रात्रीस देती आज
तुझ्या स्वप्नांचे पहारे

अंगणी रातराणीचा 
बहर आला
तुझ्या प्रेमाचा
सुगंध त्यात दरवळला

चांदण्याच्या प्रकाशात
रात्र सरली
तुझी माझी आठवण
मनात मी कोरली


- सुप्रियावीरा नार्वेकर 

नात बाप-लेकीचं

" नात बाप-लेकीचं "


काल रात्री सहज T .V  पाहत बसले होते channels change करताना एका serial चे title song बघून तिथेच थांबले, 

Zee मराठी वर "असे हे कन्यादान" ह्या नव्या मालिकेचे title song चालू होते.  आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन आहे. पण त्यात नवीन नाही तर खास आहे ते म्हणजे त्याची सुरुवात ती म्हणजे...

"नात बाप-लेकीचं " आणि संपूर्ण शिर्षक गीतामध्ये लक्षणीय गोष्ट आढळली ती म्हणजे कुठेही नायक किंवा नायिका नसून त्यात आहेत बाप आणि लेकींचे photographs !!! अतिशय सुंदर शब्द आणि मांडणी …

ऐकून नाही थांबवू शकले स्वतःला आणि लगेचच माझ्या बाबांना जाऊन मिठी मारली मी आणि म्हणाले " मी नाही जाणार तुम्हाला सोडून कुठे" न मग त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. 

त्या शिर्षक गीतामधल्या शेवटच्या ओळी मनाला स्पर्श करून गेल्या…  
"लेक परक्याचे धन 

बाबा तुटतो आतून 

आला गोठलेला क्षण 
शुभमंगल कन्यादान "

खरंच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना ????
किती आर्त वेदना होत असतील त्याला !!!
बाप  आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण. 
आणि ह्याचा अनुभव मी प्रत्येक क्षणी घेते. 
बाबा हा शहाळ्यासारखा असतो , बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. 
कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर … 
लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. 
संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो. 
संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो.
बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो , लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही  बाबा असतो. 
कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही  बाबाच असतो. 
पिकनिकसाठी पण पैसे बाबच देतो. 
shopping करताना आईने कमी  किमतीचा dress काढला तर हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारासुद्धा बाबाच असतो. 
आईने काही काम सांगितले तर तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो. 
लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे,  तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि 
लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो.
पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते. 
लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराहि बाबाच !!!
आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!
ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही.  आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार. 
आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो. 
आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना आतून तुटणारा बाबाच असतो. 
"दिल्या घरी सुखी रहा  म्हणताना " मनातून खचलेलाही बाबाच असतो. 
असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो. 
आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते. 
लेकीचा स्वतःपेक्षा  जास्त विश्वास तिच्या बाबावर असतो. 
लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही . 
ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते. 
एक गोंडस परी … 
बाबा I Love You So Much....

- सुप्रियावीरा नार्वेकर

हमने बस प्यार करना सिखा ...

हमने  बस प्यार करना सिखा ...

Thank You नावाचे तिळगुळ !!!

"तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला "

आजचा दिवससुद्धा नेहमीसारखाच सुरु झाला. ऑफिसला जाण्यासाठी नेहमीची बस पकडली. गेली ३ वर्षे ह्याच बसने प्रवास करतेय, पण आजचे conductor काका वेगळे होते. गर्दीही फारशी नव्हती आज. तिकीट देण्यासाठी ते माझ्याकडे आले , नेहमीचे नसल्यामुळे त्यांना stop चे नाव सांगून १२ रुपये दिले, त्यांनी machine मधून तिकीट फाडले आणि मला दिले, ते घेताना माझ्या सवयीप्रमाणे मी त्यांना  " Thank You " बोलले. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते पुढे निघून जायला हवे होते पण ते तिथेच थांबले. मी त्यांच्याकडे पाहिले , मला वाटले काही राहिले का ? पण ते माझ्याकडे पाहत म्हणाले " बाळा मला माझ्या ह्या नोकरीत आजपर्यंत कोणी तिकीट दिल्यानंतर "Thank You " नाही बोलले. उलट सुट्टे पैसे मागितले, पुढे जा म्हणालो तर उद्धटासारखी उत्तरे मिळतात. पण तू बोललीस , नेहमी सुखी आणि आनंदी राहशील." आणि ते पुढे गेले.

ते पुढे निघून गेले पण मी मात्र त्याच विचारात रहिले.
" Thank You " म्हणणे हि माझी फार पूर्वीपासूनची सवय आहे. मग ते Bus Conductor असो, रेल्वेचे तिकीट देणारे असो , auto वाला किंवा taxi वाला किंवा दुकानदार असो.
पण आज एक गोष्ट समजली कि माझ्या " Thank You " बोलण्याने मी एक क्षण का होईना कोणालातरी आनंद देऊ शकले, समाधान देऊ शकले आणि त्याने माझ्या मनाला दुप्पट / तिप्पट समाधान मिळाले. प्रेम दिल्याने वाढते ह्याचा पुन्हा एकदा अनुभव आला.
हेच प्रेम देण्यासाठी पैशांची किंवा वेगळे काही कष्ट घेण्याची गरज नाही.  फक्त आपली वाणी रसाळ असावी. शब्द नाती जोडतात आणि तोडतातही.
त्यामुळे एखाद्याशी कटू बोलण्यापेक्षा थोडे गोड बोललो तर आपलं काहीच बिघडत नाही.

योगायोगाने आजचा दिवस आहे "मकर संक्रांतीचा " !!!
सगळे एकमेकांना "तिळगुळ घ्या गोड गोड बोला " ह्या शुभेच्छा देत  आहेत पण हे फक्त messages पुरते मर्यादित न रहाता खऱ्या जीवनात पण तो रसाळपणा आणि ते माधुर्य आले तर जीवन पण किती सुंदर होईल ना !!!
तिळगुळाच्या हलव्यालासुद्धा धार असते पण ती धार सुद्धा एकदा का जीभेशी मैत्री झाली कि विरघळून फक्त गोडवाच देते.
तसच विचारांचे आहे जर आपल्या चांगल्या विचारांची मैत्री योग्य शब्दांशी झाली तर त्यातून फक्त प्रेमच निर्माण होईल.
प. पू. बापूंनी २५ डिसेम्बर २०१४ च्या प्रवचनात सांगितले कि " २०१५ च्या नवीन वर्षाचा संकल्प करूया - प्रेम देण्याचा. ह्या वर्षी आपण थोडे तरी प्रेम द्यायला शिकूया."
आणि आजच्या ह्या अनुभवामुळे हा संकल्प मनात कोरला गेला. नुसते मकरसंक्रातीला गोड बोलण्यापेक्षा हे रसमाधुर्य आयुष्यभर जपले पाहिजे. प्रेम किंवा आनंद दिल्याने वाढतो , कमी होत नाही.
"तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला "

- सुप्रिया नार्वेकर

My Rangoli






Urja Musical Band Concert Promotion

Urja Musical Band Concert Promotion